कर अष्टमी
सहर्ष स्वागत करत आहे "विचारमंथन" *एक आठवण* पूजा कराष्टमीची परवाच कराष्टमी झाली आणि जुन्या आठवणी जाग्या झाल्या. आमच्याकडे म्हणजे माझ्या माहेरीही 'कराष्टमी' पूजा करायचे ती आठवण झाली. आम्ही परीक्षा संपली की सगळे दिवाळीसाठी भुसावळहून चाळीसगावला जायचो. ही पूजा रात्री होत असे. त्यादिवशी चंद्राला नैवेद्य दाखवला जायचा. स्वयंपाक वरणभात, भाजी- पोळी, भजी, शिकरण, गोड पुऱ्या. अजून इतर काही नैवेद्य दाखवल्याशिवाय कोणी जेवायचे नाहीत. स्वयंपाक सोवळ्यात असायचा. कोणीही उष्टे करायचे नाही. हा तिथला नियम होता आणि त्या दिवशी नेमका चंद्रोदय उशिरा असायचा रात्री दहाच्या पुढे. सर्व लहान मुलं भूक लागायची झोपून जायची त्यावेळेस आत्तासारखे बारा वाजेपर्यंत जागरण करत नव्हते. नऊ वाजले की सगळे मुलं झोपून जायचे. आजी आम्हाला झोपू द्यायची आणि मग परत नैवेद्य झाला की उठवून जेवायला बसवायची. अर्धवट झोपेत आम्ही जेवण करायचो पण काय मजा गोड पुरी खाण्यासाठी प्रत्येक जण उठायचे. पूजा मांडलेली बघून खूप मन प्रसन्न व्हायचे. आता त्यातल...
सुलाहर म्हणजे क़ाय ताई
ReplyDelete