Posts
Showing posts from October, 2020
शक्ती महिमा
- Get link
- X
- Other Apps
सहर्ष सादर करीत आहे "विचारमंथन" *शक्तीचा महिमा* या देवी सर्व भूतेषु मातृरूपेण संस्थिता l या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता l नमस्तस्ये नमस्तस्ये नमस्तस्ये नमो नमः l आजकाल व्यवहारात 'लेडीज फर्स्ट' हा शब्द फार प्रचलित झाला आहे तेव्हा काही वयस्कर लोकांच्या मनात येते की हा पाश्चिमात्य शब्द का वापरतात? तसे पाहिले तर हा अनादी काळापासून चालत आलेला शब्द आहे तर तो कसा की जेव्हा आपण धार्मिक पूजा करतो, तेव्हा गुरुजी आपल्याला पूजा सांगतात तेव्हा प्रथम श्री व पुरुष असे दोघं मिळून पूजा होते पण सुरुवात करताना श्री गणेशाय नमः उमापती - शिव किंवा सिता- राम, राधा - कृष्ण, असे म्हणतात. म्हणजेच काय स्त्री ला अगदी पुरातन काळापासून पहिले स्थान आहे. तिला शक्तीचे स्थान दिले आहे. म्हणून तिची पूजा करतात. तर शक्ती ही फार महत्त्वाची आहे! शक्ती म्हणजे (ताकद नाही ) प्रेरणा आहे. देवांनी सुद्धा दानवांना मारण्यास शक्तीचा उपयोग केलेला आहे . स्त्री ही अनंत काळची माता आहे .शिवाजी महाराजांची जिजामाता, कुंत...
आशीर्वाद
- Get link
- X
- Other Apps
सहर्ष स्वागत करत आहे "विचार मंथन " "आशिर्वाद" आशिर्वाद हा निशुल्क, असून अमूल्य आहे. तो देताना किंवा घेताना पैसे द्यावे लागत नाही. मोठ्यांनी लहानांना दिलेला मनापासून एक अमूल्य ठेवाच आहे, खरेतर देवाचेच हे आशिर्वाद ,मोठे लोक माध्यम होऊन आपल्याला देतात. त्यांच्यात एवढी शक्ती आहे ती (अनाहत) दिसत नाही, पण पाठीशी उभी असते. हि ज्याच्या त्याच्या अनुभवाची आणि विश्वासाची गोष्ट आहे. आणि हे संस्कार सुद्धा आहेत जे आई वडील आपल्या मुलांना शिकवतात. त्यात शास्त्रीय कारण पण आहे की आपल्या मनात नम्रते चा भाव उत्पन्न होतो. म्हणूनच मोठे लोक जेव्हा भेटतात तेव्हा आपण त्यांना वाकून नमस्कार करतो. याच्या वरून एक गोष्ट आठवली, एका गावात एक मध्यमवर्गीय कुटुंब राहत होते, आई वडील व त्यांचा एक मुलगा गणू. ते खूप कष्ट करून पैसा मिळवत होते. चरितार्थ चालवत होते. एक दिवशी वडील अचानक आजारी पडले. डॉक्टर ईलाज बराच झाला. जवळ होते नव्हते ती जमा पुंजी खर्च झाली. आजार काही बरा झाला नाही. त्यांना बायको ...
वानोळा
- Get link
- X
- Other Apps
सहर्ष स्वागत करत आहे" विचार मंथन" वानोळा आपल्याकडून दुसऱ्याला आपुलकीने दिलेली भेट ,म्हणजे वानोळा आम्ही लहान होतो तेव्हाची पद्धत होती ती. तर वानोळा ,म्हणजे ती एक माया च असायची हृदयातून पोटापर्यंत जाणारी, एकमेकांकडे , खाद्य पदार्थ ,देण्याचा एक संस्काराचा आणि वाटून खाण्याचा आनंद, खूप मज्जा यायची कारण गरीब-श्रीमंत असे काही नव्हते .हे एक जवळीक सधन्याचा व प्रेम टिकवून ठेवण्याचे माध्यम होते. आमच्या शेजारी दादा वहिनी ,मावशी काका, भाऊ दादा, असे प्रेमाचे नातेवाईक राहात असत . सांगायचे म्हणजे त्यांच्याकडे शेती,फळबाग होती. तर त्यांच्याकडून गल्लीत सर्वांना फळ चिकू ,सीताफळ ,पेरू , केळी चा तर अख्खा घडच मिळायचा त्यात पाच,दहा डझन तरी केळ असायचे ते पिकवायचे, केळांचे वेफर बनवायचे. तर कधी कच्च्या...